भाजप सेनेची गेली २५ वर्षांची युती खऱ्या अर्थाने आज तुटली

भाजप सेनेची गेली २५ वर्षांची युती खऱ्या अर्थाने आज तुटली. गेले काही दिवस मी शिवसेनेला शिव्या घालत होतो, दोष देत होतो. परंतु माझ्या मुंबईतील काही मित्रांनी पाठवलेल्या अनेक पोस्ट वरून भाजपच या गोष्टीला जवाबदार आहे असे वाटते. त्यांनी जे मुद्दे मांडले ते पुढिल प्रमाणे. १) मागची १५-२० वर्षे सोडल्यास भाजपला जे यश मिळाले त्यात शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे. शिवसेना जेव्हा महाराष्ट्रात खूप जोमात होती तेव्हा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला देखील पुढे आणण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. भाजप सशक्त झाल्यावर पुढे हळूहळू शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करेल हि शंका सुध्दा शिवसेनेला तेव्हां आली नाही. २)युती तुटून हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊन नये म्हणून शिवसेनेने अनेक वेळा दोन पावलं माघार घेऊन भाजपला जे हवं ते मान्य केले. ३) १९९९ साली शिवसेनेला ६९ व भाजपला ५६ जागा मिळून १२५ जागा + ६ अपक्षांचा पाठिंबा म्हणजे आवश्यक बहुमतापेक्षा जास्त जागा मिळूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले. याचे कारण भाजपला शिवसेनेच्या हाती मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते. गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्रीपद मिळ...